शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यात आजपासून खत, बियाणे विक्री बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:59 IST

सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार ...

सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राजन मामनिया, भूषण शहा, एस. एस. पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.यवतमाळ जिल्ह्यातील पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषध फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू झाले. तसेच बरेच शेतकरी व शेतमजूर बाधित झाले आहे. या घटनेला कीटकनाशके विक्रेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कृषी साहित्य विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या परिस्थितीत कृषी साहित्य विक्रेत्यांना आपले व्यवसाय सुरू ठेवणे कठीण झाले आहे.ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात यावेत, निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत, आॅनलाईन परवान्यांत समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत. शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निविष्ठा कायद्याच्या कक्षेत कशा घेता येतील, याचा विचार करण्यात यावा, शासनाकडून सर्व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र, कृषी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे, बियाणे, कीटकनाशके व खते यांचे हस्तलिखित साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे. दोन दिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. बेमुदत दुकाने बंद ठेवणे आणि धरणे आंदोलन करणे या एकमेव पर्यायाचा अवलंबला जाईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :agricultureशेती